‘विलोभ’ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे समर्थक आणि राजधानी दिल्लीत महाराष्ट्र-संस्कृतीचे ‘अस्सल राजदूत’ म्हणून कार्यरत असलेल्या कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह

दिल्लीतील १८ मराठी भाषिक कवींच्या मुख्यत: मराठी व काही हिंदी कवितांचे हे संकलन रसिकांच्या हाती देताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे. ही सर्व मंडळी गेली काही दशके महाराष्ट्राबाहेर तर आहेच पण जवळजवळ सगळीच तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, दूरसंचार अशा कवितेपासून दूर असणाऱ्या क्षेत्रांत आपापला ठसा उमटवलेली मंडळी आहेत. केवळ मातृभाषा आणि महाराष्ट्र हीच प्रेरणा, हाच दुवा आणि हाच ध्यास घेतलेली ही मंडळी आहेत.......